असे आम्ही

*असे आम्ही-१*

मराठवाड्यात दुष्काळ
पाचवीलाच पुजलेला
कोरडा सारा रानमाळ
डोळा आश्रुंनी भिजलेला

महापूराच्या गोष्टी फक्त
आम्ही बातम्यात पाहतो
पावसाला विटाळ आमुचा
वाराही कोरडाच वाहतो

नौकरीच्या शोधार्थ तरूण
मुंबई-पुण्याला धाव घेतो
शेतकऱ्यांच्या कापसाचा
इथं कवडीमोल भाव होतो

फरफट होते संसाराची
आयुष्य रोजंदारीत जाते
खांद्याला लावून ती खांदा
नव-याबरं पाचरटात राबते

उरात दाटलेली दुःखे
उरातच दबली जातात
कर्माला दोष देण्याशिवाय
काहीच नसते हातात

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*ldsawant.blogspot.in*

No comments: