*मृत्यू हेच सत्य*
बोल्ट असो वा कोणीही
शेवटी शरणागती आहे
कितीही मडवा सोन्याने
शेवटी देहाची माती आहे
हात उगारायला नाही
हात जोडायला शिका
पणतीवाणी जळूनीया
सगळ्यांची मने जिंका
कपड्याची खरी किंमत
सरणावरती कळते
काटाही न टोचलेलं अंग
तिथं धडा धडा जळते
वर्ष किती लोटलेस तू
स्वरूप समजून घ्यायला
दोन गज जमीन पुरेशी
अनंतात विलीन व्हायला
मी-तू पणा सोड आता
मिळून मिसळून जग
सुर्याला लपवू पाहणारे
चिरकाल नसतात ढग
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment