पुन्हा येवो रामराज्य

रामा तुझ्या राज्यामधे
आद्भुत लागलय घडू
रामच गेला जीवनातील
अनुभव येतायत कडू

मर्यादा आपल्यासम इथं
कोणीच पाळत नाही
कितपत चालवावी जीभ
काहींना हेही कळत नाही

परस्री मातेसमान मानणे
आता सारेच विसरलेत
तिची आब्रु लुटण्याईतपत
कित्येक नराधम घसरलेत

सुखी प्रजेची संकल्पना
केव्हाच झालीय नष्ट
अन्यायाचे झेलत घाव
अजूनही सोसतेय कष्ट

भावा-भावामधून आता
विस्तवही जात नाही
माणुस नावाची जात
आता दिसूनच येत नाही

कोणतीच सासू सुनेला
अजूनही मानत नाही लेक
संयम नाही कोणाकडेच
उडतो संतापाचा उद्रेक

पुन्हा येवो श्रीराम राज्य
हीच मनाला अभिलाषा
नाहीतर कटकारस्थानाने
काळवंडून जातील दिशा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*