निकाल
जाता संपून परीक्षा
जीव पडतो भांड्यात
येता निकालाचा दिस
मन पडते कोड्यात
ज्यांनी केली मेहनत
फळ त्यांनाच मिळते
कोण किती पाण्यामधी
निकालाने ते कळते
कतृत्वाला शबासकी
देत आसतो निकाल
मानहानी करणारी
नको आळशी ती चाल
कोणी अपयशी होता
नका जाऊ रे खचून
जग जिंकायचे आहे
सांगा साऱ्यांना टिच्चून
आहे निकाल सांगत
रोज करावा अभ्यास
संकटाशी दोन हात
करण्याचा घ्यावा ध्यास
✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in
No comments:
Post a Comment