प्रेमाने जग जिंका
सुंभ जळून जातो तरी
सुटला जात नाही पीळ
गाठी मनात बांधल्या की
विकासाला बसते खीळ
मी मोठा मीच हुशार
मी पणात सरते वय
अंती मात्र हिशोब होतो
नसतेच तिथे हयगय
थोड्या थोडक्या यशाने
हुरळून नसते जायचे
काय राहते शेवटी इथे
शब्द गोड बोलायचे
नाही काहीच श्वाश्वत
तरी कसला अहंकार
मिळून मिसळून जग
कशाला शब्दांचे वार?
चार दिस सासूचे जरी
सुनेचेही असतात चार
प्रेमाने जग जिंकता येते
आता तरी कर विचार
✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in
No comments:
Post a Comment