आता फक्त लढायचं

आता फक्त लढायचं

नको फासी घेऊ राजा
आता फक्त  लढायचं
भले येतील संकटे
नाही कधी रडायचं

हमी नाहीच भावाची
तरी उत्पन्न घ्यायचं
नाही निसर्गाची साथ
तरी पेरीत राह्यचं

कर्ज मानगुटी जरी
नाही मोडून जायचं
फास सावकारी सारे
दूर फेकून द्यायचं

हवे हक्काचे आम्हाला
  हिंमतीने सांगायचं
समृद्धीला साऱ्यांनीच
  वेशीवर टांगायचं

हातामधी हात घेत
हक्कासाठी लढायचं
मोर्चा निमित्त रे फक्त
अन्यायाशी भिडायचं

लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

No comments: