आजच्या औरंगाबाद येथील आग्नितांडव व फटाक्यामुळे झालेले नुकसान खूपच भयानक होते..शाळेला सुट्टी लागताना आम्ही सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रदुषणमुक्त व फटाकेमुक्त दिवाळी पथनाट्य सादर केलेले किती समर्पक होते याचा प्रत्यय आला.म्हणुनच आजचे हे काव्य* 👇🏻
आनंदात विरजण हे
आज पडले काहीसे
आताच कसे होत्याचे
झाले क्षणात नाहीसे
क्षणाची ती रोषणाई
काय सांगा कामाची
वाहून कष्टे जाणार
माती मोल घामाची
असे हे अग्नितांडव
सुखी स्वप्न बेचिराख
पैसाचा चुराडा झाला
मालमत्ता इथं खाक
किती पक्षी जायबंदी
किती किती प्रदुषण
कोण सांगणार किती
झाले असेल नुकसान
सावध व्हा आतातरी
ऐका पुढल्या हाका
प्रदुषण करणाऱ्याला
चला आतातरी रोखा
म्हणुनच प्रदुषणावर
घातला पाहीजे आळा
का ओढवाता संकटे
फटाके वाजवणे टाळा
🙏🏻फटाके वाजविणे टाळा 🙏🏻
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
फटाके वाजवणे टाळा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment