दिवाळी सुट्या संपल्या

औरंगाबाद जिल्ह्यात दि.०९/११/२०१६ पासून दिवाळी सुट्टी नंतर शाळा सुरू होत आहेत , इतर जिल्ह्यातही या अथवा पुढील आठवड्यात शाळा सुरू होत आहेत..आणि शिक्षक बंधुंना सुट्टी नंतर प्रगत महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करायची आहे.त्यानिमित्ताने*
🏃🏻 *दिवाळी सुट्या संपल्या* 🏃🏻
✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*
चला शिक्षक मिञांनो
चला वाट शाळेची धरू
संपल्या दिवाळी सुट्या
शाळेचाच विचार सुरू
इवलेशी ती मुले शाळेत
आपुल्या आधी येथील
दिवाळीच्या सर्व गमती
एकमेकांना सांगतील
आपल्यालाही ते विश्व
समजून घ्यावेच लागेल
दिसभर मस्तीत त्यांच्या
सामील व्हावेच लागेल
विचारा त्यांना दिवाळीत
फराळ संपवला कीती
फटाक्यांची कोणकोणा
वाटलेली होती भीती
दिवाळीत जरी आपण
थोडे सुस्तावले असु
बनविले किती किल्ले
जरा विद्यार्थ्यांना पूसु
पहिला दिस तरी फक्त
तुम्ही द्या विद्यार्थ्यांसाठी
अॉनलाईन, टपालाच्या
मग कशाला हव्या अटी
प्रगत व्हावाच महाराष्ट्र
हीच मनात आहे इच्छा
पहिल्या दिवसासाठी
मनापासून शुभेच्छा
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
📱 *९४०३६८२१२५*

No comments: