*भाज्यांचे महत्त्व*
नको आम्हा चॉकलेट
आणि नकोच ती मॕगी
आई डब्यात आमच्या
आता देत जा ग भाजी
ताज्या हिरव्या भाजीने
व्हिटॕमीन मिळतील
रोगराई मग साऱ्या
दूर दूर पळतील
मोड आलेली मटकी
आणि सारी कडधान्ये
करी शरीरा समृद्ध
मन हे ताजे-तवाने
रोज करूनी व्यायाम
राहू आम्ही तंदुरुस्त
कच्चे गाजर काकडी
टाकू करूनीया फस्त
आम्ही शाळेत शिकलो
हवे आहारात सत्व
म्हणूनच या भाज्यांचे
आम्हा वाटते महत्त्व
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment