🙏🏻 *शहरवासीयांनो*🙏🏻
जळतयं गाव संपात तरी
शहराला काही घेणं नाही
फेकतयं चार पैसे जास्त
त्यांना अजूनही उणं नाही
शेजारी कोणी मेलं तरी
ह्यांना माहित होत नाही
अन्याय होत असतानाही
रक्तच सळसळत नाही
संप अजूनही संपलेला नाही
किती दिवस महागाचं खाल?
पाव चिकन मासांहार अन्
उसळीवरती पोट भराल?
हक्काचं मागतोय बळीराजा
द्यायला हवी तुम्हीही साथ
AC तो गारवा सोडून जरा
त्याच्यासाठी याल का संपात?
दोन दिवस त्याच्यासाठी
तुमचीही हवीय साथ
झोपलेले कुंभकर्णवृत्तीला
मारायचीय जोरदार लाथ
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment