*धरतीचे नंदनवन*
देवतांच्या वासाने पावन
जम्मु नि कश्मीर झाले
निसर्गानेही मुक्त हस्ताने
इथं सौंदर्य बहाल केले
ट्युलिप फुलांनी बहरलेलं
माझ्या भारताचे नंदनवन
धर्मांध दहशतवाद्यांमुळे
त्याला लागले आहे ग्रहण
धरतीचा हा स्वर्ग आता
नरकच बनू पाहतोय
बर्फाच्या पाण्यामधून
रोज लालझरा वाहतोय
नसानसात भरलीय जणू
फुटीरतावादी संस्कृती
माणुसकीचा खून होऊन
दिसू लागलीय विकृती
फुटीरतावाद्यांना धडा
आता शिकवायला हवा
भारताचा हा नंदनवन
आता वाचवायला हवा
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment