*आम्ही भारतीय*
कटू अनुभव सारे
आम्ही विसरून जातो
एकमेका तिळगूळ
आम्ही भरवून येतो
ध्येय एकच आमुचे
एक आमुचे विचार
सौहार्दाने नांदायचे
आम्ही गिरवून घेतो
विभागलो जरी आम्ही
नाना जातीपातीमधी
जास्त ताणायचं नाही
आम्ही ठरवून घेतो
सारे भांडलो कितीही
तरी एकत्र नांदतो
वेळ पडता, वैऱ्यांची
आम्ही जिरवून येतो
रंग कुणाचा हिरवा
रंग कुणाचा भगवा
रंग तिरंग्यात येता
सारे हरवून जातो
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment