ती मध्यराञ

जरा डोकावून पाहिल तर
एकही दंगल घडली नाही
जाळपोळ तर सोडनच द्या
एकही गाडी फोडली नाही

काळा पैसा हाच एकमेव
याच्या मागच कारण आहे
काळ्यापैसावाल्यांची आता
पाचा-वरती धारण आहे

संसदेत जरी गोंधळ झाला
सगळा देश रांगेमधी आहे
काळा पैसा स्वर्ग जरी
काट्यांची ती गादी आहे

इनामदारीने नित्य राहणारे 
झाले आहेत मनातून खूष
देशहीताला पोखरलेली ती
अचुक मारलेली आहे घुस

निर्णायाची ती मध्यराञही
मनातून सुखावली असेल
स्वतंत्र भारतात आता तरी
सामान्य जन आतुन हसेल

No comments: