जीवन गाणे गातच जावे

*ओळीवरून कविता*🍂🍃
*जीवन गावे गातच जावे*

आपले का व्हावे सर्वांनी
आपणही सर्वांचे व्हावे
झाले गेले विसरावे अन्
जीवन गाणे गातच जावे

चालायचच म्हटल्यावर
ठेच तर लागणारच की
किती जागणार अंधारात
झोप तर लागणारच की
खुशाल निशेच्या वर्षावात
राञभर भिजत जागावे

कोणाच्या भाग्यात आहेत
त्या मखमली पायघड्या
प्रत्येकाच्याच कोणीतरी
इथं काढणारायत खोड्या
खोड्यांनी का हिरमुसावे
हसून सारे विसरून जावे

नकटीच्या लग्नाला नित्य
असतात हजारो विग्न
स्वप्न सत्यात उतरत असता
अचानक पावतात भग्न
वाळूचा किल्ला बनवायचा
आपण का सोडून द्यावे

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

No comments: